Saturday, November 01, 2008

तू

तूझे आणि माझे एक अगम्य नाते होते,
तू जवळ होतास, तेव्हा वाटे खूप परका आहेस तू
"तू खरच फक्त माझा आहेस?"
पण तू सोडून गेलास तेव्हा कळाले की तू माझा आहेस की नाही माहित नाही,
पण मी फक्त तूझीच आहे.
काळ सरला की आठवणी पुसट होतात म्हणे,
खोटं आहे ते, काळासरशी तूझ्या आठवणी अधिक गडद होत गेल्या
मन तूझ्या आठवणींच्या जेरबंद कोठडीत अजूनही बंदिस्त आहे
हि शीक्षा ते स्वतःहूनच भोगत आहे.
तूझ्या आठवणी ह्या फक्त आठवणी न राहता
मला दुखा:त फुंकर घालणारा, सुख देणारा अव्याहत स्त्रोत आहेत.
तू दिलेल्या दु:खांच्या देखिल मी सुंदर बागा फुलविल्या आहेत,
त्या बागांची माळीण देखिल मीच आहे.
त्या बागांमधे मी कधीपण मनाला फिरायला घेवून जाते
आणि निरस आयुष्यात त्या सुंदर बागांचा सुगंध आणि गारवा आणते.

5 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

काळ सरला की आठवणी पुसट होतात म्हणे,
खोटं आहे ते, काळासरशी तूझ्या आठवणी अधिक गडद होत गेल्या

khup chhan :)

Varsha said...

dhanyawad!! Thanks

Nandkumar Waghmare said...

khupach chan. mala avadale. agadi manatalya bhavana aahet hya.

Varsha said...

thnks!! खरयं कविता खुप आतुन, ह्र्दयातुन आली की सगळ्यांनाच भावते.

Nayana Kulkarni-Dongare said...

Nice one!